Akshay Gawale Maharashtra 0

मावळ्यांनो हीच योग्य वेळ आहे महाराष्ट्रात पुनच्छ: एकदा मराठेशाही प्रस्थापित करण्याची.

Show your support by signing this petition now
Akshay Gawale Maharashtra 0 Comments
2 people have signed. Add your voice!
1%
Maxine K. signed just now
Adam B. signed just now

आज तमाम मराठा समाज आपसातील सर्व मतभेद व पक्षभेद विसरून सतत वेगवेगळया मार्गांद्वारे होणाऱ्या अन्यायाविरूद्ध एकत्रपणे तेही कायदेशीर व शांततेच्या मार्गाने लढतोय तरीही सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.हे कमी म्हणून की काय सरकारातील काही प्रमुख घटकांकडुनंच मराठा समाजाची खिल्ली उडवली जात आहे व आपल्या समाजातील आया-बहिणींच्या इज्जतीचे सर्रासपणे धिंडोरे काढले जात आहे आणि हा सर्व तमाशा मराठा समाजातील राजकारणी लोक हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन निमुटपणे पाहत आहे,किती दुर्देवी गोष्ट आहे ना ही..!

आजपर्यंत कायमच थोरल्या भावाची भूमिका घेतलेला,दुष्काळाने हताश झालेला,गरिबीने पिचलेला, आरक्षणाअभावी पंचायत झालेला,शिक्षणाच्या खर्चापुढे वाताहत झालेला,नोकऱ्याअभावी बेरोजगार झालेल्या आणि नेत्यांच्या राजकारणामुळ देशोधडीला लागलेल्या मराठा समाजाची अवस्था जणू काही बोकडाचं आमिष दाखवून पिंजऱ्यात पकडलेल्या वाघाप्रमाणेच झालेली आहे.निवडणुकीनंतर हेच राजकारणी त्या बोकडाच्या मटनाची पार्टी वाघासमोरच साजरी करतात हे कमी म्हणून की काय यांच्यातीलच काही बांडगुळ पिंजऱ्यातल्या वाघाला काठी टोचून मोठ्या फुशारकीने स्वतःला वाघ म्हणवून घेतात.

आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांकडुन शिवछत्रपतींच्या नावाखाली समाजाची निव्वळ दिशाभूल करण्यात आली आहे आणि खोट्या आश्वासनांनी जनतेची फसवणूक व पिळवणुकचं करण्यात आली आहे.कदाचित या करणानेच समाजात या सर्व राजकीय पक्षांबद्दल प्रचंड चिड व खदखद आहे.

बस्सं...अजुन किती सहन करायचे तुम्ही आम्ही..? मावळ्यांनो नाकातोंडापर्यंत तर पाणी आलेलेच आहे अजुन काही दिवस असेच निमुटपणे सहन करत राहिलात तर नक्कीच नव्या पिढीच्या डोळ्यातं तुम्हालां भविष्यातील गडद अंधारच दिसेल.

आजतयागत जेव्हा जेव्हा समाजाने हाक मारली तेव्हा तेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून श्रीमंत श्री छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत श्री छत्रपती संभाजीराजे भोसले आपण कायमच रयतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात त्याबद्दल सर्व रयत आपली ऋणी आहेत.याची प्रचिती मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा संपूर्ण समाजाला झाली.सामाजिक बांधिलकी प्रमाणेच समाजाची राजकीय बांधिलकी म्हणून खुद्द आपण स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा अशी इच्छाच जणु संपूर्ण रयतेच्या मनात आहे.म्हणूनच या सर्व समाजाच्या वतीने व समाजाचा एक घटक म्हणून मी एक सर्वसामान्य मराठा आपणाला विनंती करतो की आपण मराठ्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा व शिवछत्रपतींनी बघितलेले स्वराज्याचे स्वप्न पुन्हा एकदा नव्याने या मॉडर्न महाराष्ट्रातं साकारावे हीच एक विनंती.धन्यवाद.एक मराठा लाख मराठा..!

In short,

To be or not to be that is not a question now,If we aren't be in today then we may be not in future that is the equation now..!

To support please sign this petition & MUST SHARE,THANK YOU.


Share for Success

Comment

2

Signatures